Dharamshala-Stadium 
क्रीडा

INDvSA : धरमशालात कोसळधार; पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

वृत्तसंस्था

धरमशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा पहिला टी-20 सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. धरमशाला येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

रविवारी (ता.15) दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सामना उशिरा खेळविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. काही वेळाने पाऊस ओसरला. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे मैदानात पाणी साचले होते. ते पाणी काढण्यासाठी काही कर्मचारी मैदानात उतरले. मात्र, पावसाचा जोर वाढतच गेला. शेवटी सामना रद्द करण्यात आला. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन टी-20 सामने होणार आहेत. त्यापैकी आज धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. चंदीगड येथे दुसरा टी-20 सामना बुधवारी (ता.18) होणार असून तिसरा टी-20 सामना रविवारी (ता.22) बेंगलोर येथे होणार आहे. 

आगामी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार असल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापक त्याकडे पाहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT