Dharamshala-Stadium 
क्रीडा

INDvSA : धरमशालात कोसळधार; पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

वृत्तसंस्था

धरमशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा पहिला टी-20 सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. धरमशाला येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

रविवारी (ता.15) दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सामना उशिरा खेळविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. काही वेळाने पाऊस ओसरला. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे मैदानात पाणी साचले होते. ते पाणी काढण्यासाठी काही कर्मचारी मैदानात उतरले. मात्र, पावसाचा जोर वाढतच गेला. शेवटी सामना रद्द करण्यात आला. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन टी-20 सामने होणार आहेत. त्यापैकी आज धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. चंदीगड येथे दुसरा टी-20 सामना बुधवारी (ता.18) होणार असून तिसरा टी-20 सामना रविवारी (ता.22) बेंगलोर येथे होणार आहे. 

आगामी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार असल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापक त्याकडे पाहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT